Posts

Showing posts from June, 2017

होळकर कालीन बारव्यांच्या शोधात भाग-२

Image
*पुनर्वसन व सुशोभिकरण* दि.२९ मे २०१७ रोजी राज्य महामार्ग क्र. १४३ मल्हारपेठ-पंढरपूर रोड वरती माणदेशातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यांतील निंबवडे गावाच्या ईशान्येकडील माण तालुक्याच्या हद्दीत असलेल्या होळकर कालीन बारव्याची मी तसेच यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते पप्पू शिंगाडे, सुमितराव मेटकरी व अतीश कोळेकर या सर्वांनी पाहणी केलीच होती. त्याबद्दल मी सविस्तरपणे होळकर कालीन बारव्याच्या शोधात भाग-१ मध्ये वर्णन केलेले आहे त्यानंतर दि.६ जून २०१७ रोजी त्याच राज्य महामार्ग क्र.१४३ मल्हारपेठ-पंढरपूर या मार्गावर आटपाडी तालुक्यांतील  दिघंची या गावापासून  झरे या गावाकडे जाताना दोन-तीन कि.मी. अंतरावर तशाच प्रकारचा पिंडीच्या आकाराचा होळकर कालीन बारवा पाहावयास मिळाला. सध्या त्या बारव्याची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपाची असून हा बारवा पूर्णता पडझड झालेल्या अवस्थेत आहे. सध्या मी महाराष्ट्र राज्याबाहेर असल्याने मला काही शक्य झाले नाही परंतु माझे सहकारी मित्र  दिघंची गावचे सुपूत्र अजय पाटोळे यांच्या माध्यमातून संबंधित बारव्याचे फोटो संकलित केले गेले आहेत ते खालील छायाचित्रांत पा...

होळकर कालीन बारव्याच्या शोधात भाग-१

Image
*पुरातन बांधकामाचे सुशोभिकरण* काल दि. २९ मे २०१७ रोजी राज्य महामार्ग क्र. १४३ मल्हारपेठ-पंढरपूर रोड वरती माणदेशातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यांतील निंबवडे गावाच्या ईशान्येकडील माण तालुक्याच्या हद्दीत असलेल्या होळकर कालीन बारव्याची पाहणी करताना मी स्वता व आमचे मित्र यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते पप्पू शिंगाडे, सुमितराव मेटकरी व अतीश कोळेकर. रणरागिणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी केवळ त्यांच्या इंदौर राज्यापुरताच मर्यादित राज्यकारभार केला नाही तर अखंड भारत देशभर त्यांनी विकासकामे केली. प्रशासन व्यवस्थेवर त्यांची चांगलीच जरब असायची. देशभर विकासकामे त्यांनी स्वताच्या खाजगीतूनच केली. मग त्यामध्ये काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारकापासून आसाम पर्यंत सर्व ज्योतिर्लिंगाचा जिर्नोद्धार, नद्यांवरती घाट, विहीरी, शेततळे, तलाव, आश्रमशाळा, वाटसरूंसाठी धर्मशाळा, उपहारगृहे तसेच बारवे यांचे बांधकाम केले होते. त्यातीलच हा एक होळकर राज्यकालीन बारवा.  सद्या हा बारवा पडझड झालेल्या अवस्थेत असून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने यशवंत युवा सेना शाखा निंबवडे येथिल यु...

क्रांतीची धगधगती मशाल विझू देऊ नका :नितीनराजे अनुसे

Image
देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्ष होत आली तरीही पारतंत्र्याचं जीणं (जीवन) जगत असलेल्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले अधिकार मिळत नसतील तर त्या अधिकारांपासून/हक्कांपासून धनगर जमातीला वंचित ठेवणाऱ्या शोषणकर्त्या औलादी असलेल्या सत्तापिपासू राजकर्त्यांच्या विरोधात स्व.बी.के.कोकरे साहेबांनी जो आरक्षणाचा लढा उभा केला आहे तो लढा थांबवू नका. हक्काच्या आरक्षणासाठी (अनुसुतित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी) आरक्षणाची जी चळवळ उभा केली आहे ती चळवळ बलशाली करा. ज्या क्रांतीच्या मशाली स्व.बी.के.कोकरे साहेबांनी आम्हा युवकांच्या हातात दिल्या आहेत त्या धगधगत्या मशाली शमता (विझता) कामा नयेत त्या अशाच पेटत्या ठेवा. धनगर जमात ही एक आदिम आणि मुख्यत्वे मेंढपाळ व्यवसाय असणारी जमात असून या जमातीने कोणत्या राजाच्या पोटी जन्म घेतला नाही तर या मातीवरती होणारी परकीय शत्रुंची आक्रमणं रोखण्यासाठी छातीवर घाव झेलून आणि छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर दुश्मनांना सळो की पळो करून सोडणाऱ्या थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकरांचा वारसा लाभलेली ही जमात आहे, स्त्री असून देख...

समाजातील संवेदनशीलता संपलीय का?

Image
धनगर म्हंटलं की रांगडा गडी, एकेकाला लाल मातीत लोळवणारा बलशाली, पैलवान (ताकदवान), बुद्धिमान, चपळ अशी कितीतरी विशेषणे लावली तरी कमीच पडतील, शत्रूंशी लढताना निधड्या छातीवर तलवारींचे  वार झेलणारा लढवय्या आणि तितकाच सर्वांशी आपुलकीने वागणारा एक प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्ति अशीच ओळख असणारा धनगर हा मुक्या जनावरांची शेळ्या-मेंढ्यांची तहान-भूक जाणू शकतो तर आम्हांसारख्या चालत्या बोलत्या माणसाच्या भावना समजणे त्याला काहीच अवघड नाही. पण हल्ली धनगर समाजातील संवेदनशीलताच लोप पावत चाल्लीय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. खरंतर हे इतर दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या समाजाला उद्देशून लिहीत नाहीये तर मतलबी दुनियेमध्ये स्वताचा स्वाभिमान विसरणाऱ्या धनगर समाजातील समाजबांधवांना हे उद्देशून लिहतोय कदाचित काहीजनांच्या हे जिव्हारी लागेल पण त्यागोदर मी त्यांची जाहीर माफी देखिल मागतो. कारण माफी न मागण्याइतपत तरी मी काही निर्दयी आणि निष्ठूर नाहीये. खरंतर दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे वारसदार असलेल्या जमातीला उद्देशून लिहायची गरज पडायला नको होती पण आपल्याच धनगर समाजाने मला मजबूर केले म्हणून लिहावेसे वाटल...

धनंजय सरगर औक्षवंत हो

Image
वाढदिवस तुझा अनोखा... आमचे परममित्र जीवलग मित्र धनंजय सरगर यांस वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छांची. झेप अशी घे की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळव की सागर अचंबीत व्हावा, इतकी प्रगती कर की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुचोहीकडे पसरवशील. धनंजय तुला वाढदिवसाच्या छोट्याशाच हार्दिक हर्दिक शुभेच्छा. जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!              नितीनराजे अनुसे अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली           +९१७६६६९९४१२३ nitinrajepublications.blogspot.com

राष्ट्रपती पुरस्कार विजेता टिंग्या फेम शरद गोयेकर यशवंत युवा सेनेचा युवकप्रदेशाध्यक्ष

Image
गुरूवार दि.१५ जून २०१७ रोजी आटपाडी ता.आटपाडी दि.सांगली येथे झालेल्या यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या विशेष बैठकी दरम्यान यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती पुरस्कार विजेता व आपल्या सर्वांचा लाडका टिंग्या अर्थातच बब्या चित्रपटाचे युवा दिग्दर्शक मा.शरद गोयेकर यांची यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या युवक प्रदेशाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली. या विशेष बैठकी दरम्याण झालेल्या सर्व निवडी पुढील प्रमाणे... 1. मा.शरद गोयेकर. (युवक प्रदेशाध्यक्ष यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य) 2. मा.श्री.पै.राहूल रूपनवर-पाटील. (सांगली जिल्हा प्रमुख यशवंत युवा सेना) 3. मा.श्री.तानाजीराजे गोयेकर. (मुंबई विभाग प्रमुख यशवंत युवा सेना) 4. मा.मयुर कुदनर. (अहमदनगर जिल्हा प्रमुख यशवंत युवा सेना) 5. मा.श्री. महेश कचरे (सातारा जिल्हा प्रमुख यशवंत युवा सेना) यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही एक क्रांतीकारी आणि लढवय्या संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून समाजाचे, वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत...