अन् आईच्या डोळ्यात पाणी आलं....
"पुन्हा एक नवी दिशा" हे माझे पहिले पुस्तक माझ्या आई-तात्यांना समर्पित ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे मी काहीतरी देणं लागतो म्हणून अंधकाराच्या खाईत भरकटलेल्या माझ्या भोळ्या भाबड्या समाजाचे गेल्या तीन-चार वर्षापासून समाजप्रबोधन करतोय. सातत्याने समाजप्रबोधनपर लेखन चालूच आहे शिवाय कार्यक्रम देखिल त्यामुळे व्याख्याने, सत्कार, सन्मान हे साहजिकच होत राहणार. मुंबईला असताना एखादेवेळी कार्यक्रमासाठी गावाकडे आलो तर घरी बसायची कधी उसंत नसायची सतत गडबड आणि पळापळ... हो मोठेपणा म्हणून सांगत नाही तर वस्तूस्थिती म्हणून सांगतोय. आई-तात्यांना समजायचं नाही की मी नक्की काय करतोय ते... पण कार्यक्रमात केलेल्या सन्मानाचा फेटा अथवा एखादे सन्मानचिन्ह हातात दिसले की त्यांना एवढंच समजायचे की मी कुठेतरी कार्यक्रमाला जाऊन आलोय. पण घरी आल्यासारखं चहा-नाष्टा करण्यासाठी सुद्धा कधी कधी वेळ नसायचा जेवण तर दूरची गोष्ट त्यामुळे आई-तात्या चिडचिड करायचे. कधी कधी तर तात्या म्हणायचे सुद्धा की आपला धनगर समाज म्हणजी धनगरी जत्रा अन् कारभारी सत्रा अशातला प्रकार हाय. कितीही...